Thursday, February 9, 2023

'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.

'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.                     


कराड /प्रतिनिधी : 
        स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचे होते. लोकांना शिक्षण दिल्यानेच स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त होईल हे जाणणारी काही जाणकार मंडळी होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात   स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतरच्या काळात देशाची उभारणी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शिक्षणाचा प्रसार काही विभूतींनी केला. त्यात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बहुजन समाजापर्यंत ज्ञानकिरणे पोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था आणि रयत शिक्षणसंस्थेने केले. त्यामुळेच बहुजनांची मुले शिकू शकली असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर यांनी केले. 
        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिराचे उद्घाटक म्हणून शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.अभय जायभाये, कराड पंचायत समितीचे  माजी उपसभापती रमेश देशमुख,  महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच मौजे. कोळे गावच्या सरपंच सौ.भाग्यश्री देसाई, प्राचार्य डॉ.अरुण गाडे, प्रा. सुरेश रजपूत आदी. प्रमुख उपस्थितीत होते. 

        अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर पुढे म्हणाले, एन.सी.सी आणि एन.एस.एस या दोन योजना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांकडून सकारात्मक आणि रचनात्मक काम करून घेतात. यामधून मिळणारे संस्कार पुढे आयुष्यभर पुरतात. आयुष्याला एक योग्य दिशा देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. 
        उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुभजी गावडे म्हणाले, विलासराव (काका) पाटील- उंडाळकर हे विकासाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होत. कराड दक्षिणेचा जो कायापालट त्यांनी केला त्यामुळेच जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. कायमच जनसेवेला प्राधान्य दिले. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात देखील काका संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे उंडाळकर कुटुंबीयांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. आज काका नाहीत पण काकांचा वैचारिक वारसा उदयसिंह (दादा) पाटील मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. 
        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये म्हणाले, आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून संस्कारक्षम, पथदर्शी काम उभं करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेणे आवश्यक वाटते.              
        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, समाजसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एन.एस.एस च्या माध्यमातून शिबिरार्थी स्वच्छतेचे काम करतात हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. कोळे गावात देखील आमचे विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करतील अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.               
        यावेळी उपसरपंच सुधीर कांबळे, माजी उपसरपंच संतोष शिंनगारे, श्रीकृष्ण पाटील, करिष्मा संदे, सुषमा देशमुख, माधुरी साळुंखे, कांताबाई पाटील मुख्याध्यापक यादव सर, काटकर सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.सुभाष कांबळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा.अभिजीत दळवी तर आभार प्रा.अण्णासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुभाष बोलाईकर तसेच प्रा.दिपाली वाघमारे, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा.संभाजी पाटील प्रा.सौ.वंदना पवार, हरीविवेक कुंभार, पंकज कुंभार यांच्यासहित सर्व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

फोटो कॅप्शन : 
    मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर सोबत कौस्तुभजी गावडे, प्रा.अभय जायभाये, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सरपंच सौ.भाग्यश्री देसाई आदी. मान्यवर



विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात उंडाळकर कुटुंबीयांची मोलाची साथ - कौस्तुभ गावडे

विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात उंडाळकर कुटुंबीयांची मोलाची साथ - कौस्तुभ गावडे


कराड/ प्रतिनिधी: 
    विलासराव (काका) पाटील- उंडाळकर हे विकासाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होत. कराड दक्षिणेचा जो कायापालट त्यांनी केला त्यामुळेच जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. कायमच जनसेवेला प्राधान्य दिले. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात देखील काका संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे उंडाळकर कुटुंबीयांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. आज काका नाहीत पण काकांचा वैचारिक वारसा उदयसिंह (दादा) पाटील मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत असे प्रतिपादन श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभजी गावडे यांनी केले.                                

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर शिबिराचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.अभय जायभाये, कराड पंचायत समितीचे  माजी उपसभापती रमेश देशमुख,  महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच मौजे कोळे गावच्या सरपंच सौ. भाग्यश्री देसाई, प्राचार्य डॉ.अरुण गाडे, प्रा. सुरेश रजपूत आदी. प्रमुख उपस्थितीत होते.

        कौस्तुभजी गावडे पूढे म्हणाले, बापूजींनी मौजे. कोळे गावात जी पुण्याई उभी केली त्याचीच प्रचिती म्हणून गावाने संस्थेच्याच बापूजी साळुंखे महाविद्यालयावर विश्वास ठेवून हे शिबिर आयोजित केले. या बाबीचा मला विशेष आनंद वाटतो. शिबिरार्थी देखील गावाने ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवतील अशी मला आशा आहे.

        शिबिराचे उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचे होते. लोकांना शिक्षण दिल्यानेच स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त होईल हे जाणणारी काही जाणकार मंडळी होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व   कालखंडात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतरच्या काळात देशाची उभारणी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शिक्षणाचा प्रसार काही विभूतींनी केला. त्यात शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बहुजन समाजापर्यंत ज्ञानकिरणे पोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेने केले. त्यामुळेच बहुजनांची मुले शिकू शकली. 

        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये म्हणाले, आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून संस्कारक्षम, पथदर्शी काम उभं करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेणे आवश्यक वाटते.              

    शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, समाजसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एन.एस.एस च्या माध्यमातून शिबिरार्थी स्वच्छतेचे काम करतात हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. कोळे गावात देखील आमचे विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करतील अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.               

        यावेळी उपसरपंच सुधीर कांबळे, माजी उपसरपंच संतोष शिंगारे, श्रीकृष्ण पाटील, करिष्मा संदे, सुषमा देशमुख, माधुरी साळुंखे, कांताबाई पाटील मुख्याध्यापक यादव सर, काटकर सर तसेच मौजे कोळे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. सुभाष कांबळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा. अभिजीत दळवी तर आभार प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष बोलाईकर तसेच प्रा. दिपाली वाघमारे, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. संभाजी पाटील प्रा.सौ. वंदना पवार, पंकज कुंभार, हरीविवेक कुंभार यांच्यासहित सर्व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

फोटो कॅप्शन : 
    मौजे. कोळे ता. कराड येथे एन.एस.एस उद्घाटन प्रसंगी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना मा. कौस्तुभजी गावडे सोबत अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर,  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्रा. अभय जायभाये, सरपंच सौ भाग्यश्री देसाई आदी. मान्यवर.



Wednesday, January 4, 2023

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)                

कराड/प्रतिनिधी: 

        अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे अज्ञानाला दूर करण्यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, जातीभेद यासारखे प्रश्न पारतंत्र्याच्या काळात २०० वर्षांपूर्वी एखाद्या स्त्रीने घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला शह देणे तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण सावित्रीबाईंनी ते करून दाखवलं. त्यामुळे आजची  स्त्री जोखडातून मुक्त झाली. म्हणूनच आज दोन शतकानंतरही सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा आहे. सावित्री प्रत्येक स्त्री चे दैवत आहे. सावित्री स्त्री जगताची 'आई' आहे आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे असे भावनिक प्रतिपादन आदर्श शिक्षिका सुरेखा राजेंद्र शेजवळ यांनी केले.                 

         बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित सावित्रीच्या लेकींचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापिका शुभदा नारायण गायकवाड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. सुरेखा शेजवळ पुढे म्हणाल्या, आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांचे कार्य व विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा हा समस्त स्त्री जातीच्या स्वातंत्र्यासाठी दिला होता. हे मनोमन स्मरण करणे गरजेचे आहे. विशेषतः महाविद्यालयीन युवतींनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

            शुभदा गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाल्या, मळलेल्या वाटेने न जाता, सर्वसामान्य जीवन न जगता समस्त बहुजन समाजाच्या निरक्षरतेच्या बेड्या तोडण्याचे काम फुले दांपत्याने केले. पुढे हाच वसा बापूजींनी जपला व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साक्षरतेचे काम पुढे चालू ठेवले. आज त्याच सावित्रीच्या व बापूजींच्या पुण्याईवर आम्ही उभे आहोत हे सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याची परिपूर्ती सावित्रीबाईं मुळेच होऊ शकली. सावित्री ज्योतिबांच्या कार्याची खरी प्रेरणा व ऊर्जा होत्या. आज समाजात सावित्रीबाईंच्या कामाचा लहानसा का होईना वाटा उचलणाऱ्या सावित्रीच्या लेकी आहेत. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज अशा लेकींचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.  धनश्री कुलकर्णी, धनश्री पाटील, रेखा सूर्यवंशी, रूपाली जाधव, ऐश्वर्या पाटणकर व प्रियांका यादव या सावित्रींचा वसा जपणाऱ्या लेकींचा  शुभदा गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.यू.आर.पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.शोभा लोहार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.टी.एम.आतार यांनी केले तर आभार सौ. एस.पी.काळे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन: 

सावित्रीच्या लेकींचा सत्कार करताना, मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सुरेखा राजेंद्र  शेजवळ, शुभदा नारायण गायकवाड, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी मान्यवर.









https://www.facebook.com/100085440955380/videos/1237913230136335/?mibextid=Nif5oz