Tuesday, January 27, 2026

श्रमातून संस्कार आणि संस्कारातून व्यक्तिमत्त्वाचा विकास फुलवणारे व्यासपीठ म्हणजे विशेष श्रमसंस्कार शिबिर ______प्राचार्य डॉ. लालासाहेब जाधव.

 

 

A person speaking into a microphone

AI-generated content may be incorrect.


  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलीत, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे कालवडे 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत  संपन्न होत आहे. शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपुर जिल्हा सांगली चे मा. प्राचार्य लालासाहेब जाधव होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, श्रमातून संस्कार आणि संस्कारातून व्यक्तिमत्त्वाचा विकास फुलवणारे व्यासपीठ म्हणजे विशेष श्रमसंस्कार शिबिर होय. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मी स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास. इतरांसाठी जगलास तरच खऱ्या अर्थाने जगलास हे तत्त्वज्ञान या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वरती बिंबवले जाते. यातूनच विद्यार्थी घडतात. देशाचे भावी आदर्श नागरिक नागरिक बनण्यास मदत होते. . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केवळ समाजसेवा म्हणून श्रमाचे संस्कार होत नाहीत तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगले बदल घडवणारे हे व्यासपीठ आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. परंतु या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खेडे गावचा विकास करण्याची संधी मिळते. सात दिवसाच्या या शिबिरात आपण सर्व विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका मिळून नक्कीच ग्रामविकासात मोलाचा सहभाग द्याल अशी मी अशा व्यक्त करतो. व शिबिराचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो. 

           उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, स्वयंसेवकांनी सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना समजून घेतली पाहिजे व आपले योगदान समाजासाठी दिले पाहिजे. या योजनेतून आपल्यामध्ये केवळ श्रमाचे संस्कार येणार नाहीत तर आपल्यातील नेतृत्व गुण, आपल्यात लपलेला कलाकार व आपल्यात असणारा देशाचा आदर्श नागरीक तयार होणार आहे. कालवडे गाव व आपले महाविद्यालय यांचे ऋणानुबंध खूप वर्षापासून आहेत. या शिबिराच्या माध्यमातून ते जपण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. 

             या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य सौ गीतांजली थोरात व ग्रामपंचायत सदस्य बालेश राव थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. सुदाम मोटे होते. तसेच गावच्या पोलीस पाटील  सौ शुभांगी गाडे  उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव.

 

शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव.

A group of men sitting at a table in front of a screen

AI-generated content may be incorrect.


 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने  मृदा व पाणी परीक्षण या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली. सत्र एकचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. रत्नदीप जाधव विलिंगडन महाविद्यालय सांगली हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, भारतासारख्या कृषिप्रधान देशात शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरील नऊ इंच मातीचा थर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यातूनच आपल्याला शेती करता येते. तो थर निघून गेला तर जमीन नापीक बनते. यासाठी मृदेत कोणते घटक आवश्यक आहेत. मृदा संवर्धनासाठी काय केले पाहिजे. याचे उत्तर मृदा परीक्षणातूनच मिळते. पाणी म्हणजे जीवन त्यामुळे आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा टीडीएस किती पीएच किती हे तपासूनच  आपण त्याचा वापर केला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी शेती योग्य जमीन व पिण्यायोग्य पाणी संवर्धन करणे काळाची गरज आहे.  

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे  होते. आपल्या अध्यक्षीय मनोगता ते म्हणाले, मृदा व पाणी परीक्षण या विषयावरील महाविद्यालयात होणारी कार्यशाळा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. कारण आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहोत. तसेच पिण्यायोग्य पाणी मिळणे ही प्रत्येकाची गरज आहे. मृदा व पाणी परीक्षणामुळे आपले जीवन सुरक्षित होण्याचा रामबाण उपाय मिळेल. या कार्यशाळेसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो! 

         या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक गुरव यांनी केला आभार आग्रणी प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

निसर्गातील बदलामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे____ प्रो. डॉ. राजेखान शिकलगार.

 

निसर्गातील बदलामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे____ प्रो. डॉ. राजेखान शिकलगार.

A group of people sitting at a table

AI-generated content may be incorrect.

 

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने मृदा व पाणी परीक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या सत्र दोनचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. राजेखान शिकलगार राजाराम महाविद्यालय कोल्हापूर हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृदा व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस हवामानात अभूतपूर्व बदल होताना दिसत आहेत. पर्जन्याची अनिश्चितता त्यामुळे शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिलेली आहेत. शाश्वत शेतीची संकल्पना राबवत असताना मृदा व पाणी परीक्षणासाठी जीआयएस सारखे तंत्रज्ञान वापरले तर शेती समस्येवर अचूक उपाय मिळतील. तसेच एखाद्या भूभागावरील विस्तृत स्वरूपात पाण्याची स्थिती काय आहे त्याचा सरासरी टीडीएस किती आहे पीएच किती आहे याची सर्वसाधारण माहिती जीआयएस तंत्रज्ञानातून मिळू शकते. त्या माहितीच्या आधारे विविध नकाशे तयार होतात व त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीचे आकलन होणे सुलभ होते. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. कारण निसर्गातील बदल व त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. 

          कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, जी आय एस सारखे तंत्रज्ञान खूपच उपयुक्त आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी याचा वापर म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण करणे होय. भूमिगत पाण्याचे साठे व ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे या तंत्रज्ञानामुळे समजते. 

           या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. साधन व्यक्तीचा परिचय प्रा. सुरेश काकडे यांनी केला. आभार आग्रणी विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले.  सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.