Monday, June 5, 2023

भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे देण्यासाठी प्रयत्नशील राहू - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे देण्यासाठी प्रयत्नशील राहू - 

                                                                प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड   

( पुनीत सागर अभियानाअंतर्गत साळुंखे महाविद्यालयाकडून कृष्णा नदीकाठालगतची स्वच्छता)                
कराड/प्रतिनिधी: 
        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एनसीसी छात्रसैनिकांमार्फत पुनीत सागर अभियानास देशभरात डिसेंबर २०२१ पासून सुरुवात केली गेली. जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवणे तसेच स्थानिक लोकांना जलीय प्रदूषणासंदर्भात जागरूक करणे असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाला देशभरातून व्यापक लोकप्रियता प्राप्त होत असून हे अभियान एनसीसी छात्रसैनिकांपुरते मर्यादित न राहता जनसामान्यांनी या अभियानात समर्पित भावनेने उतरले पाहिजे तरच भविष्यातील पिढीला आपण स्वच्छ जलस्त्रोत देऊ शकू असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. 

        पुनीत सागर अभियानांतर्गत बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या एनसीसी छात्र सैनिकांमार्फत तसेच एनएसएस स्वयंसेवकांमार्फत प्रीतीसंगमावरील कृष्णा नदी तीरावरील स्वच्छता केली. यावेळी १०० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला गेला. त्यात रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल, काच सामान, नदीत सोडलेले वेगवेगळ्या प्रकारचे निर्माल्य, विशेषतः पर्यावरणास घातक कचरा याचे निर्मूलन यामध्ये केले गेले. या स्वच्छतेसोबतच छात्र सैनिकांनी व स्वयंसेवकांनी स्थानिक लोकांना तसेच तेथे आलेल्या पर्यटकांना प्रदूषणा संदर्भात जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. या अभियानांतर्गत भविष्यात चित्रकला, पोस्टर, निबंधस्पर्धा, कविता, वादविवाद, पथनाट्य आदींचे आयोजन करून अधिकाधिक प्रदूषणासंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड यांनी दिली. भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे सुपूर्द करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. 

        १९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जे.पी.सत्तीगिरी,  अॅडम ऑफिसर दिनेश कुमार झा यांच्या आदेशानुसार हे काम आम्ही एनसीसी छात्रसैनिकांकडून करून घेतले असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी एनसीसी छात्रसैनिकांसोबतच एनएसएस स्वयंसेवक त्याचबरोबर सुभेदार मेजर पी.बी.थापा, सुभेदार नानासाहेब यादव, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा.स्नेहल वरेकर, प्रा.डॉ.अवधूत टिपूगडे, प्रा.सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा.अभिजीत दळवी, प्रा.डॉ.शितल गायकवाड, प्रा.दिपाली वाघमारे  तसेच महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन: पुनीत सागर अभियानांतर्गत कृष्णा नदी काठाची स्वच्छता करताना एनसीसी छात्रसैनिक व एनएसएस स्वयंसेवक सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड.



No comments:

Post a Comment

Thanks for reply