Thursday, February 9, 2023

आत्मचरित्र व्यक्तीला इतरांप्रती संवेदनक्षम बनवतात - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

आत्मचरित्र व्यक्तीला इतरांप्रती संवेदनक्षम बनवतात - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

           
कराड/ प्रतिनिधी : 
            पुस्तक आपली गुरु आहेत. वाचन प्रिय माणसाला पुस्तके आतून बदलायला भाग पाडतात. विशेषतः आत्मचरित्र वाचली तर माणूस इतरांप्रती संवेदनशील होतो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतात. नकळतपणे आत्मचरित्र आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. विवेकी विचारांची पताका घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे डॉ. बापूजी साळुंखे यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याला प्रणाम करण्यासाठी आम्ही विवेकदीप: शोध बापूजींचा या परीक्षणात्मक परिसंवादाचे आयोजन केले. त्या माध्यमातून आम्ही बापूजींच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला अशी भावना प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी बोलून दाखवली.                                 
        बापूजी साळुंखे महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहाची सांगता प्रसंगी विवेकदीप: शोध बापूजींचा या परीक्षणात्मक परिसंवादात ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी प्रा.अशोक खोत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश यादव, प्रा.सुभाष कांबळे, सुरेश राजपूत आदी. उपस्थित होते.                  डॉ. महेश गायकवाड पुढे म्हणाले, बापूजींनी ज्या समर्पणाच्या भावनेने काम केले त्याच भावनेने गुरुदेव कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. समर्पणाच्या भावनेतूनच बापूजींचे विचार, बापूजींचे काम चिरकाल टिकू शकेल म्हणून बापूजी सातत्याने वाचले पाहिजेत.                         
            चला जगूया विवेकानंद व बापूजी या विषयावर प्राचार्य अरुण कुंभार, जागतिक हवामान बदल व समस्या यावर प्रा.डॉ.प्रवीण तळेकर तर आहार आणि आरोग्य या विषयावर प्राचार्य ईला जोगी यांची व्याख्याने झाली. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर पोस्टर प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन देखील भरविले होते. प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी २०० पेक्षा अधिक ग्रंथांचे  वाटप केले. त्यास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत वक्तृत्व, निबंध, चित्रकला सुगम गायन आदी. स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. अखेरच्या दिवशी परीक्षाणात्मक परिसंवादात महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग दर्शवून श्री स्वामी विवेकानंद सप्ताहाची सांगता केली. 



No comments:

Post a Comment

Thanks for reply