Thursday, February 9, 2023

इतरांप्रती सकारात्मक आस्था व आचरण हेच सर्वोच्च पुरस्कार -  प्राचार्य अरुण कुंभार 


कराड/ प्रतिनिधी : 
    महामानवांच्या ठिकाणी असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंद व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी नेहमी सकारात्मक आचरण, समाज बदलाचे ध्येय ठेवले होते. त्यांच्या दृष्टीने मूल्यांचे पालन करणे व पुढील पिढीसाठी सुकर मार्ग तयार करणे हेच सर्वोच्च पुरस्कार होते असे मार्गदर्शक प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार यांनी केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहामध्ये चला जगूया विवेकानंद आणि बापूजी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सुभाष कांबळे, प्रा. डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश रजपूत आदी होते. 
        प्राचार्य अरुण कुंभार पुढे म्हणाले, कार्य तत्परता असेल तरच सिद्धी मिळू शकते आणि कार्यामध्ये सत्य,शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकी आळा ही तत्त्व ओतप्रोत भरली असली पाहिजेत. कोणत्याही कार्याची सिद्धता, समाधान आनंदात परावर्तित करणे हा सर्वोच्च पुरस्कार आहे. विवेकानंद व बापूजी हे मार्गदर्शक गुरु म्हणून त्यामुळेच श्रेष्ठ ठरले. 
        कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, श्री स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हे युवकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. सदविवेक बुद्धीचा वापर केल्याने कीर्ती व कार्यसिद्धी अल्पजीवन कालावधीत देखील साधली जाते याचे विवेकानंद मूर्तीमंत उदाहरण आहेत. तर बापूजी सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था सर्व स्तरातील लोकांसाठी खुले करणारे महामानव होते. या दोन्ही महामानवांकडून जीवन कसे जगावे परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे याचे सम्यक ज्ञान मिळते. 
        पाहुण्यांचा परिचय प्रा. सुभाष कांबळे यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा.डॉ. मारुती सूर्यवंशी तर सूत्रसंचालन कु. शितल गायकवाड यांनी केले. आभार प्रा. सुरेश यादव यांनी मानले या वेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते                    

फोटो कॅप्शन : 
        'चला जगूया विवेकानंद व बापूजी' या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य अरुण कुंभार सोबत प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी मान्यवर.




No comments:

Post a Comment

Thanks for reply