Thursday, February 9, 2023

साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो.- प्रा. डॉ. राजेंद्र लादे.

साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो - प्रा. डॉ. राजेंद्र लादे.


        कराड, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागाच्या वतीने "कथानिर्मिती संकल्पना" या विषयावर अभ्यागत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून के. सी. कॉलेज तळमावले येथील प्रा. डॉ. राजेंद्र लादे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कथानिर्मिती कशी होते, कथानिर्मितीसाठी आवश्यक घटक, कथानिर्मितीतील उत्स्फूर्तता व कथानिर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या रोजगार संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील मॅडम होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो. समाजातील घडणाऱ्या अनेक घडामोडींचे चित्रण आणि त्याचा मानवाशी असणारा संबंध यातून साहित्यनिर्मिती होत असते. सकस साहित्यनिर्मिती नेहमीच चांगल्या समाजउभारणीसाठी उपयुक्त असते. कथा हा वाड्.मयप्रकारही या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दयानंद कराळे यांनी केले तर आभार मराठी विभागाचा विद्यार्थी अक्षय घाडगे यांनी मानले.   

फोटो कॅप्शन : 
        बापूजी साळुंखे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजेंद्र लादे सोबत मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्वला पाटील, प्रा. डॉ. दयानंद कराळे.



No comments:

Post a Comment

Thanks for reply