Wednesday, January 4, 2023

इंद्रजीत देशमुख साहेबांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील - राहुल पाटील (घारेवाडी येथे बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे एकदिवसीय शिबिर संपन्न)

इंद्रजीत देशमुख साहेबांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील -  राहुल पाटील   (घारेवाडी येथे बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे एकदिवसीय शिबिर संपन्न)               

कराड/प्रतिनिधी: 

        सध्या देशभरात जात, धर्म, प्रांतांमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या दरी निर्माण करण्याचे काम होत आहे. पण शिवम आध्यात्मिक सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनं जोडण्याचा, मानवतावाद जपण्याचा, सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम मा. इंद्रजीत जी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत. आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती, मानवतावाद, पर्यावरण संरक्षण प्रबोधनातून हजारो युवकांना आम्ही सकारात्मक जगण्याचा कृतीशील मार्ग दिला आहे. एकंदरीतच विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झालेली आमची संस्था बलशाली भारत घडवण्यासाठीच सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवत आहे असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.                     

        शिवम प्रतिष्ठान मध्ये झालेल्या एक दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सचिव प्रताप भोसले, खजिनदार प्रताप कुंभार, विश्वस्त दत्तात्रय पवार, धनंजय पवार तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी. उपस्थित होते. राहुल पाटील पुढे म्हणाले, गेली वीस वर्षांपासून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर तरुणाईला सजग करत आहोत. समाज प्रबोधनपर विकासात्मक उपक्रम राबवित आहोत. प्रतिष्ठान मधून अधिकारी होऊन गेलेले तसेच समाजात विविध स्तरावर काम करणारे आमचे युवक समाजभान जपत काम करीत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.                         

        प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रभर चाललेले शिवम प्रतिष्ठानचे कार्य थक्क करणारे आहे.  शिवमची कार्यपद्धती समाजातील सर्वांनाच प्रेरक, ऊर्जा देणारी आहे. या प्रतिष्ठान मध्ये येणारा युवक कधीच वाम मार्गाला लागू शकत नाही. एवढी ताकद शिवमच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला कायमच आमच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम सोबत काम करणं गौरवास्पद वाटते. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही देखील श्रमसंस्कृती जपणारे, समाजकेंद्री विचाराचे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. साळुंखे महाविद्यालयातील शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देश प्रेमाचे नारे देत, स्फूर्तीगीते गात, उत्साही, चैतन्याने भरलेल्या वातावरणात श्रम सोहळा रंगविला. घारेवाडी येथे होऊ घातलेल्या युवा हृदय संमेलनाच्या दृष्टीने संपूर्ण परिसर स्वच्छतेचे काम करण्यात आले. विशेष करून वृद्धाश्रम परिसराची स्वच्छताही करण्यात आली. यावेळी धनंजय पवार, दत्तात्रय पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.अण्णा पाटील, प्रा.संभाजी पाटील, प्रा.सुभाष कांबळे, प्रा.दयानंद कराळे, हरीविवेक कुंभार, पंकज कुंभार, डॉ.अवधूत टिपूगडे, प्रा.गोरख गायकवाड, प्रा.युवराज कापसे, डॉ. लीधडे,  प्रा.शोभा लोहार, प्रा. स्नेहल वरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment

Thanks for reply