Tuesday, October 14, 2025

जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे उज्वल यश

 

जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे उज्वल यश

 

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा वाई येथे सहभाग घेतला व उज्वल यश संपादन केले. त्याबद्दल कराड व परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धा 10 ऑक्टोंबर 2025 शुक्रवार रोजी किसनवीर महाविद्यालय वाई जिल्हा सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट या विद्याशाखेअंतर्गत भूगोल विभागाची विद्यार्थिनी प्रणाली नथुराम जगदाळे हिने 'मृदा परीक्षण निरक्षरता कृषी विकासातील आव्हान' या विषयावरील सादर केलेल्या पोस्टरला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या प्रकारात अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी वकार अहमद मुजावर याने 'पोल्ट्री व्यवसाय आर्थिक सक्षमीकरणाचे साधन' या विषयावरील संशोधन प्रकल्प  पोस्टरला तृतीय क्रमांक मिळाला. दोन्ही विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होणाऱ्या विधापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत निवड झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांची प्रेरणा मिळाली.

           सदर अविष्कार  संशोधन स्पर्धेमध्ये भूगोल विभागाची द्वितीय क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी प्रणाली जगदाळे हिला प्रा. दीपक गुरव  यांचे मार्गदर्शन लाभले तर अर्थशास्त्र विभागाचा तृतीय क्रमांक मिळालेला विद्यार्थी वकार मुजावर याला डॉ. मारुती सूर्यवंशी अविष्कार संशोधन प्रमुख व स्पर्धा संघ प्रमुख, तसेच अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अविष्कार संशोधन समितीचे सदस्य डॉ. स्वाती मोरकळ, डॉ.आशा सावंत, डॉ. शितल गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

 

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

A group of men standing in front of a white board

AI-generated content may be incorrect.


श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात एनसीसी युनिट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात सहभागी होणारे विद्यार्थी शिस्तबद्ध होतात. त्यांच्या जीवन चारित्र्यात  शिस्त आपोआप दिसून येते. एनसीसीतील विद्यार्थ्यांनी चुका टाळल्याच पाहिजेत कारण समाज त्यांच्याकडे  सैनिक म्हणूनच बघत असतो. वरिष्ठांचे आज्ञा पालन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जो विद्यार्थी एनसीसी प्रमुख असेल म्हणजे सार्जंट किंवा ज्युनियर अंडर ऑफिसर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढे स्वतःचा आदर्श निर्माण केला पाहिजे. जेणेकरून इतर विद्यार्थीही त्यांच्यासारखे चांगले घडतील. जेव्हा छात्र सैनिक अंगावरती वर्दी चढवतो तेव्हा त्या वर्दीचा आदर राखणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे.  रँक मिळत असतात परंतु त्याचबरोबर जबाबदाऱ्यांचे पालन ही तितकेच महत्त्वाचे आहे. रँक मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.

       या कार्यक्रमात महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. सचिन बोलाईकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच SUO अभय भाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्व पात्र एनसीसी कॅडेट ना वेगवेगळ्या रँक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरित करण्यात आल्या. यामध्ये SUO म्हणून अभय भाकरे यांना रँक मिळाली तर ज्युनिअर अंडर ऑफिसर म्हणून अथर्व गरुड याची नियुक्ती झाली. कार्यक्रमात एनसीसी विभागाने 2024 25 कालावधीत केलेल्या विविध उपक्रमांच्या अहवालाचे वाचन एनसीसी प्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी केले.

             कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एनसीसी च्या GCA युक्ता कांबळे उपस्थित होत्या. सर्व एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. बी. कोळी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. सारिका लाटवडे यांनी केले. आभार प्रा. सविता येवले यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री पंकज कुंभार व श्री प्रकाश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Thursday, September 25, 2025

"रासेयो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने, राष्ट्राचा शाश्वत विकास साधता येतो. ______ प्रा. जालिंदर काशीद."

 

रासेयो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने, राष्ट्राचा शाश्वत विकास साधता येतो.
______
प्रा. जालिंदर काशीद.

A person standing at a podium with people sitting behind him

AI-generated content may be incorrect.

 

      श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व शैक्षणिक वर्ष 2025 26 चे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रा. जालिंदर काशीद होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने राष्ट्राचा शाश्वत विकास होतो. आपल्या अवतीभवती विविध समस्या आहेत. त्या एक दिवसात किंवा काही क्षणात संपणाऱ्या नसतात. त्या निरंतर उपलब्ध असतात. त्या कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सतत असले पाहिजे. आधुनिक युगात ज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षण हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. हेच कर्तव्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला करण्याची संधी आहे. पर्यावरण विषयक अनेक कायदे आहेत. परंतु प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी होत नाही. भ्रष्टाचाराचा परिणाम हे देखील प्रदूषणाचे एक कारण बनले आहे. एनएसएस च्या माध्यमातून आपण गावोगावी शिबिरे घेतो. या शिबिराच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मूलन,ग्राम स्वच्छता, वनराई बंधारे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, इत्यादी उपक्रम प्रत्यक्ष राबवण्याची संधी आपल्याला मिळत असते. आणि यातूनच कृतिशील समाजसेवा घडते.

                    कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते आपल्या  मार्गदर्शनात ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच मी माझ्यासाठी नाही.आपल्यासाठी आहे. नॉट मी बट यु म्हणजेच समाजसेवेची संधी या योजनेतच मिळते. या योजनेत काम केल्याने राष्ट्रप्रेमी नागरिक नक्कीच घडतात व तेच या देशाच्या शाश्वत विकासात भर घालतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपला प्रत्यक्ष समाजाशी सहसंबंध निर्माण होतो त्यामुळे त्यांच्या समस्या, उपाय याचा मार्ग मिळू शकतो.

                    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचा परिचय रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.रघुनाथ गवळी यांनी केला. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी सीनियर व ज्युनिअर विभागाचे सर्व एनएसएस सदस्य, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.