Tuesday, January 27, 2026

काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.

 

काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.

A group of people in a classroom

AI-generated content may be incorrect.

 

  

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी .बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई उत्सव काव्यवाचन अतिशय उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्या मार्गदर्शनात   ते म्हणालेसावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे नवीन वर्षातला पहिला उत्सव. त्यामुळे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायलाच  हवी. जेव्हा आपण एखाद्या थोर व्यक्तीमत्वाची वेशभूषा परिधान करत असतो. तेव्हा नकळतपणे त्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये संचारत असते. तसेच दैनंदिन जीवनात आपण तसे वागावे याची जाणीव करून देत असते. तात्कालीन परिस्थितीमध्ये स्त्रीला माणूस म्हणूनच अधिकार नसताना शिक्षणाचा अधिकार मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. सावित्रीबाईंनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्या महात्मा फुले यांची सावली बनून न राहता त्यांनी स्वतःच एक वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध करून समाजकार्य व लेखन कार्य करत राहिल्या.

 आजच्या मुलींनी त्यांच्या या कार्याची आठवण ठेवून स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सिद्ध करावे. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर समर्पित काव्यवाचन करण्यासाठी  केंगार रिद्धी ,अमृता डवरी या  दोन विद्यार्थिनींनी काव्यवाचन केले. तर प्राध्यापकांमध्ये  डॉ. शितल गायकवाड ,प्रा.सुषमा चंदुगडे, प्रा.प्रियांका मदने , प्रा.डॉ.स्वाती मोरकळ ,प्रा.शैला चोबे , डॉ आशा सावंत , प्रा. ऋतुजा भाटले प्रा. दिपाली वाघमारे प्रा. तेजस्विनी दळे , प्रा शितल सालवाडगी , प्रा सुरेश रजपूत ,प्रा जीवन आंबुडारे , प्रा.अभिजीत दळवी या सर्वांनी काव्य वाचन केले महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्रा. दिपक गुरव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमास रंगत आणली.प्रास्ताविक महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या समन्वयक प्रा. सोनाली रांगोळे यांनी केले    सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी जाधव यांनी केले.  आभार प्रा.शैला चोबे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

 

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

A group of people sitting in chairs

AI-generated content may be incorrect.


श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिरात कवी संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कवी थळेन्द्रकुमार लोखंडे व कवी उद्धव पाटील यांच्या काव्य सुरांनी सायंकाळची वेळ रंगून गेली. अनंत अडचणीतून संघर्षाची वाट तुडवताना कविता जन्म घेते. कविता जगायला शिकवते. जनसामान्याच्या वेदनेला वाचा फोडते. चळवळीतील तरुणाला ऊर्जा देते. थकलेल्या भागलेल्या देहाला जगायची स्फूर्ती देते. असे प्रतिपादन कवी थंळेन्द्र कुमार लोखंडे यांनी केले.

               कवी उद्धव पाटलांनी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची आठवण आपल्या काव्यातून करून दिली. युवकांना खऱ्या तारुण्याची जाणीव करून दिली. त्यांनी प्रेम कविता, सामाजिक व देशभक्तीपर कवितांचे गायन केले. तसेच स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बालेशराव थोरात होते. मानवी जीवनाचे मर्व मर्म कविता शिकवते. समाजाच्या वेदना कविता दाखवते. विद्यार्थ्यांनी कवितेचा छंद जोपासावा.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय, स्वागत, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा.अण्णासाहेब पाटील व सर्व कमिटी सदस्यांनी केले. कवी संमेलनासाठी ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ____प्रा. अधिकराव कणसे

 


A person speaking into a microphone

AI-generated content may be incorrect.


श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिरातील राजकीय सेवा योजना व स्फूर्ती गीते प्रबोधन पर कार्यक्रमात पहिले पुष्प गुंफण्यासाठी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अधिकराव कणसे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. मन, मनगट, मेंदूच्या बळावरती माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात. याची अनेक उदाहरणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पहावयास मिळतात. आपल्या वक्तृत्वाच्या जीवावरती राजकीय पटलावरती आपले व्यक्तिमत्व उंची वरती नेणारे आर. आर. (आबा) पाटील राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले . समाजाची सेवा करून बाबा आमटे यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले. गावातील ग्राम स्वच्छता करता करता परस्परातील मनभेदांची सफाई झाली त्यामुळेच जगास प्रेम बंधू भावाच्या पटलावरती घेऊन जाण्यास राष्ट्रीय सेवा योजना समाज जागृती चे प्रमुख साधन आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन निर्मूलन, शेतीच्या समस्या, आरोग्याच्या समस्यास्त्री शक्तीचा जागर असेल असे एक ना दोन अनेक प्रश्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात. या शिबिरांमधील सर्व शिबिरार्थी नक्कीच समाजसेवेचा आदर्श निर्माण करतील असे मला वाटते.

              या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्फूर्ती गीते माननीय प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे  यांनी सादर केली. सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांना ही गीते त्यांनी गायला लावली. त्यामुळे कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आपल्या मार्गदर्शनात सर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीत गायनाने स्वयंसेवक व स्वयंसेविकांना श्रम करण्याची प्रेरणा मिळते व या श्रमसंस्कारातून समाजसेवा घडते.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात होते. राष्ट्रीय सेवा योजना स्फूर्ती गीते व जबाबदारीची जाणीव करून देणारा आजचा हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ बंधू -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील व सर्व एनएसएस कमिटी कमिटीतील सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

र्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी केले प्रा. रघुनाथ गवळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय केला तर आभार मा.बालेश राव थोरात  यांनी व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रा. अण्णासाहेब पाटील, महाविद्यालयातील एनएसएस विभागातील सर्व सदस्य व स्वयंसेवक, स्वयंसेविका उपस्थित होते.